आम्ही बांधलेल्या घरातले सर्वाधिक मटेरियल व मनुष्यबळ शक्य तितके स्थानिक असते.
स्थानिक मटेरियल वापरल्यामुळे केवळ घराचं नव्हे तर बांधकामाची प्रक्रिया देखील पर्यावरणाला पूरक होते. ट्रान्सपोर्ट साठी विनाकारण इंधन जाळले जात नाही. यामुळे स्थानिक मटेरियल ने घरं बांधायला, सिमेंट च्या घरांपेक्षा कमी ऊर्जा लागते, असे म्हणता येईल.
स्थानिक मनुष्यबळ वापरल्याने गावात रोजगार निर्माण होऊन गावातले पैसे गावात राहतात. त्याबरोबर झपाट्याने बदलणाऱ्या बांधकामाच्या क्षेत्रात सुतार, लोहार, गवंडी, बेलदार इ. सारख्या पारंपरिक व्यवसायांनादेखील वाव मिळतो.